डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विरोधकांनी जनादेशाचा अपमान केल्याची संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची टीका

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देशानं दिलेल्या जनादेशाचा अपमान केल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज केली. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. अर्थसंकल्पावर अर्थपूर्ण चर्चा अपेक्षित असून, काही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचल्याचं ते यावेळी म्हणाले. विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर कोणतंही भाष्य न करता, केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा