भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या आजच्या चौथ्या दिवशी बांगलादेशाचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. चौथ्या दिवशी बांगलादेशनं पहिल्या डावातल्या १०७ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. तत्पूर्वी, काल तिसऱ्या दिवसाचा खेळ मैदान ओलं असल्यामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करावा लागला, तर दुसरा दिवस मुसळधार पावसामुळे पाण्यात गेला. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या १-० नं आघाडीवर आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या नाबाद २९ धावा झाल्या होत्या.
Site Admin | September 30, 2024 1:55 PM | Cricket | India bangladesh
भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला
