बंगळुरु कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला. भारतीय संघाची ही मायदेशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. विराट कोहलीसह भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ बळी घेतले. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या ३ बाद १८० धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडकडं आतापर्यंत १३४ धावांची आघाडी आहे.
Site Admin | October 18, 2024 9:11 AM | Cricket | India | New Zealand
बंगळुरु कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडकडे १३४ धावांची आघाडी
