औरंगजेबाच्या कबरीला असलेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा रद्द व्हावा अशी मागणी करणारी जनहित याचिका नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. केंद्र शासनाने १९५१ मध्ये या कबरीला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला होता.. केवळ हैदराबादमधल्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा दर्जा देण्यात आला. त्यासाठी लोकप्रतिनिधींची संमती घेण्यात आली नव्हती. या कबरीचा संरक्षित दर्जा काढल्यास ही कबर बुलडोझरनं हटवता येऊ शकते, असं रतन लथ यांनी याचिकेत म्हटलं आहे.
Site Admin | March 22, 2025 5:30 PM
औरंगजेबाच्या कबरीला असलेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल
