डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 20, 2024 8:11 PM | Muralidhar Mohol

printer

मोदी सरकारच्या निर्णयामुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट झालं – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

सहकार क्षेत्रासाठी नवीन मंत्रालय स्थापन करून केंद्रातील मोदी सरकारनं गेल्या १० वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट होत असल्याचं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात सांगितलं. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेमधील कृषीक्षेत्राशी संलग्न अभ्यासक्रमाच्या ३२ व्या तुकडीतील ९९ विद्यार्थ्यांना यावेळी मोहोळ यांच्या हस्ते पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा