डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि समृद्धीसाठी केंद्र सरकार हर तऱ्हेनं प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. ७६ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित शेतकऱ्यांशी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘शेतातून थेट ग्राहकांपर्यंत’ या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना दलालांच्या मध्यस्थीशिवाय आपला माल विकून उत्पन्न वाढवता येत आहे, असंही ते म्हणाले.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा