भारत आणि बांग्लादेशात कानपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं आज तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला गेला. पावसामुळे काल दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नव्हता तर, पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाल्यानंतर खेळ थांबवावा लागला होता. त्यावेळी बांग्लादेशानं ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत पहिला सामना जिंकून १-० नं आघाडीवर आहे.
Site Admin | September 29, 2024 4:09 PM | Cricket | INDvBAN
भारत आणि बांग्लादेशात दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द
