मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मणिपूरमध्ये स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. या राज्यात शांतता प्रस्थापित होण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले आणि गेल्या चार महिन्यांमध्ये संघर्षामुळे कोणताही मृत्यू झाला नसल्याचं सांगितलं.
Site Admin | April 3, 2025 9:37 AM | Loksabha | Manipur
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यतेबाबत लोकसभेत ठराव मंजूर
