देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी देशात मलेरियाचे साडेसात कोटी रुग्ण होते, ती संख्या २०२३ पर्यंत ९७ टक्क्यांनी कमी होऊन २० लाखांवर आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये विविध राज्यांमधल्या १२२ जिल्ह्यांमध्ये मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. २०३० पर्यंत देशाला मलेरियामुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून सरकार काम करत आहे. मलेरियाच्या उच्चाटनासाठी दीर्घकालीन धोरणं, तसंच राष्ट्रीय धोरणात्मक आराखडाही तयार केला आहे.
Site Admin | December 25, 2024 8:20 PM | Malaria
2030 पर्यंत देशाला मलेरियामुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट
