डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कल असल्याचा शरद पवार यांचा दावा

राज्यात जनतेने ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सुटले नाहीत. आता जनतेने महाविकासआघाडीकडून अपेक्षा ठेवल्या असून मविआ राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

पाच वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने ४८ पैकी ३१ खासदार निवडून महाविकास आघाडीला मोठी साथ दिली. याचा अर्थ जनतेचा कल बदललेला आहे, असंही ते म्हणाले. २५ वर्षं मंत्रीपदी राहूनही दिलीप वळसे पाटील यांना मतदारसंघातली कामं करता आली नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा