सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागं टाकत महाराष्ट्रानं अव्वल स्थान मिळवलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली.
राज्यात नोंदणी झालेल्या सुमारे ७ लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी ३ लाख ६९ हजार शेतकऱ्यांकडून ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. ही खरेदी इतर राज्यांच्या तुलनेनं सर्वाधिक आहे.
येत्या ३१ तारखेपर्यंत खरेदी चालू राहणार असल्यानं सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. गरज भासली तर केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदत वाढवून मागीतली जाईल, असं ते म्हणाले.