डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्य सरकार दाओसमध्ये झालेल्या करारांची चोख अंमलबजावणी करेल- उद्योगमंत्री

दाओसमध्ये झालेल्या करारांमुळे राज्यात १६ लाख रोजगार निर्मिती होणार असून, त्यादृष्टीनं राज्य सरकार या करारांची चोख अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या करारांच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले.

 

राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअपला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी नेक्स्ट डोअर स्टार्टअप योजना सुरू केली जाणार आहे, याअंतर्गत १ लाख नवे स्टार्टअप सुरू करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं असल्याचं, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यात महाड इथं बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा भवन सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

 

सरकारच्या घरकुल योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वेक्षण करण्याची घोषणा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा