आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली बांगलादेशाच्या ताब्यात असलेल्या ९५ भारतीय मच्छीमारांची आज भारतानं सुटका केली, तर भारतानंही आपल्या ताब्यात असलेल्या ९० बांगलादेशी मच्छीमारांची सुटका केली. बंगालच्या उपसागरातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर आज संध्याकाळी ही प्रक्रिया पार पडली. मुक्त झालेले भारतीय मच्छीमार हे काकद्वीप उपविभागाचे रहिवासी आहेत. ते उद्या सागर बेटावर परततील, तिथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांची ते भेट घेतील.
Site Admin | January 5, 2025 8:02 PM | Fishermen
सीमा उल्लंघनप्रकरणी भारतीय आणि बांगलादेशी मच्छीमारांची सुटका
