नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदक मिळवलं.
अकोल्याच्या चैतन्य पाठकनं 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत, तर कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिध्दी क्षीरसागरनं गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावलं.
मीनाक्षी जाधव हिनं गोळाफेकीत रौप्यपदक मिळवलं. बॅडमिंटनमध्ये आरती पाटील आणि सुकांत कदम यांनी आपापल्या गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.