झारखंडमधल्या जामतारा जिल्ह्यात पोलिसांनी ६ सायबर गुन्हेगारांना अटक केली असून एक आंतरराज्य टोळी उघडकीस आणली आहे. सरकारी बँकांमधल्या खात्याच्या माहितीचा दुरुपयोग करून १० कोटी रुपयांहून अधिक रकमेची सायबर फसवणूक या प्रकरणी झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एहतेशाम वकारिब यांनी आज दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी पोलिसांनी या टोळीकडून १४ मोबाईल, २३ सीम कार्ड, १० एटीएम, १ लॅपटॉप, २ दुचाक्या, १ ड्रोन कॅमेरा यासह एक लाख रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे.
Site Admin | January 27, 2025 1:29 PM | Cyber crime | cyber fraud | Jharkhand Police
झारखंडमध्ये ६ सायबर गुन्हेगारांना अटक
