हिंसाचार आणि हत्या अशा शब्दांचा वापर अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी केला जातो हे दुर्दैवी असल्याचं भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नकारात्मक राजकीय वातावरण, देशाची सुरक्षा आणि त्याचा परिणाम याकडेही लक्ष वेधलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेक वेळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी केला.
Site Admin | July 18, 2024 3:00 PM | BJP spokesperson Sudhanshu Trivedi | violence
हिंसाचार आणि हत्या अशा शब्दांचा वापर अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी केला जातो हे दुर्दैवी -भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी
