वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं काल कोलकाता इथं झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या सर्वबाद 132 धावा झाल्या, भारतानं हे लक्ष्य तेराव्या षटकातच तीन गडी गमावून पूर्ण केलं. अभिषेक वर्मानं 34 चेंडूत 79 धावा करत सर्वाधिक वाटा उचलला, त्यानं केवळ 20 चेंडूत पन्नास धावा ठोकल्या. दुसरा सामना चेन्नई इथं शनिवारी होणार आहे.
Site Admin | January 23, 2025 9:55 AM | Cricket | India
वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा विजय
