डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं बैरुतमधल्या भारतीय दुतावासाचं आवाहन

हिजबुल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं आवाहन बैरुतमधल्या भारतीय दुतावासाने केलं आहे. पश्चिम आशियाई देशात प्रवास करू नये आणि लेबनन तात्काळ सोडावं असंही भारतीय दुतावासाने म्हटलं आहे. ज्यांना तिथं राहणं आवश्यक आहे त्यांनी आवश्यकता नसेल तर बाहेर पडू नये असंही दुतावासाने म्हटलं आहे.
दरम्यान, इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ५५८ जणांचा मृत्यू झाला असून अठराशे जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ५० बालकांचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा