डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

भारत बांग्लादेश यांच्यातला वीस षटकांचा पहिला क्रिकेट सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला. विजयासाठी आवश्यक 128 धावा भारतीय संघानं 12 षटकांतच केल्या. संजू सॅम्सन आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी 29 धावा केल्या. हार्दिक पांड्या 16 चेंडूत 39 धावा करुन नाबाद राहिला.

 

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशनं 20 षटकांत सर्वबाद 127 धावा केल्या. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी बांग्लादेशच्या प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केलं. अर्शदीप सिंग सामनावीर ठरला. तीन सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना येत्या बुधवारी नवी दिल्लीत होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा