डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 20, 2024 2:04 PM | INDvBAN

printer

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी क्रिकेट मालिकेत भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर आटोपला

चेन्नईत एम एम चिदंबरम मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यामधल्या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात  ३७६ धावा झाल्या. सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताने कालच्या ३३९ धावांवर डाव सुरु केला आणि ३७ धावात भारताचे उरलेले चार फलंदाज बाद झाले. आर. अश्विन यांनं ११३ धावा केल्या. 

 

बांगलादेशच्या पहिल्या डावाची सुरुवातही खराब झाली. अवघ्या ४० धावात त्यांचे ५ गडी तंबूत परतले होते. अश्विननं त्यांचे २ बळी टिपले. शेवटच वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या ५ गडी बाद ९० धावा झाल्या होत्या

सर्वाधिक वाचले

सर्व पहा