डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 22, 2024 1:39 PM | Chennai Test cricket

printer

पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात बांगलादेशावर २८० धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत १-० अशी आघाडी

चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं बांग्लादेशावर २८० धावांनी विजय मिळवला, आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विजयासाठी ५१५ धावांचा पाठलाग करत असलेल्या बांग्लादेशाचा दुसरा डाव, आज सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रातच २३४ धावांत आटोपला. भारताचा गोलंदाज आर. अश्विन यानं दुसऱ्या डावात बांग्लादेशाचे ६ गडी बाद केले. मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना येत्या २७ सप्टेंबरला कानपूर इथं सुरू होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा