परस्पर वाढीसाठी आणि जागतिक कल्याणासाठी सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांनी आज चर्चा केली. व्हिएतनाम मधल्या हनोई इथं चौथी भारत-व्हिएतनाम सागरी सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही चर्चा करण्यात आली. सागरी वैज्ञानिक संशोधन, महासागर अर्थव्यवस्था, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण, नौदल आणि तटरक्षक दलाचं सहकार्य आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी आदी विषयांवर या चर्चेचा प्रामुख्यानं भर होता.
Site Admin | August 16, 2024 8:46 PM | India | Vietnam
सागरी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि व्हिएतनाम यांची चर्चा
