बांगलादेशात कापसाच्या वाढत्या मागणीमुळे भारताच्या कापूस निर्यातीत वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. बांगलादेशातल्या सूत गिरण्यांमध्ये कापसाची मागणी वाढत असल्यामुळे भारताची कापूस निर्यात दोन तृतीयांश टक्के वाढणार आहे. या वर्षी २६ लाख गाठी इतकी निर्यात होईल, असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे. भारतातून बांगलादेशाला दर महिन्याला एक ते दीड लाख गाठी इतकी निर्यात केली जाते.
Site Admin | August 8, 2024 3:15 PM | Bangladesh | Cotton Exports
बांगलादेशात कापसाच्या वाढत्या मागणीमुळे कापूस निर्यातीत वाढ
