वर्तमान आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपी दर 6 पुर्णाक 2 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात आहे, मागील तिमाहीत हा दर 5 पुर्णाक 6 टक्के होता.
गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत भारतानं 8 पुर्णाक 6 टक्के जीडीपी वाढ नोंदवली होती. गेल्या हंगामात झालेल्या चांगल्या पावसाळ्यानंतर ग्रामीण भागातील उत्पन्नाचा वापर आणि सरकारी खर्चात वाढ झाल्यानं तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीच्या दरामध्ये वाढ झाली.