आयसीसी १९ वर्षांखालच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत Ep आज क्वालालंपूर इथं सध्या सुरू असलेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशाच्या ११ षटकांत ५ बाद ३० धावा झाल्या होत्या.
आत्तापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारत अ गटात पहिल्या स्थानावर, तर बांगलादेश तीनपैकी दोन सामने जिंकून ड गटात दुसऱ्या स्थानावर आहे.