डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 4, 2024 7:51 PM

printer

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान

विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून त्याचा फटका खरीप हंगामातल्या तूर, बाजरी, उडीद, कांदा, मूग या पिकांना बसला आहे. काही ठिकाणी फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे कापूस आणि सोयाबीन ही पिकं धोक्यात आली आहेत. जिल्ह्यातल्या ६११ गावांमधल्या १ लाख २५ हजार ७२४ शेतकऱ्यांचं २ लाख ३ हजार ४१५ हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागानं दिला आहे.

 

धाराशिव जिल्ह्यात २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात झालेल्या संततधार पावसामुळे ६ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं तर १७७ हेक्टर क्षेत्रावरच्या बागायतीचं नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागानं दिला आहे. यात उडीद, मूग, सोयाबीन, मका, कांदा, डाळिंब, पेरू, पपई या पिकांचं नुकसान झालं आहे.

 

भंडारा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने बागायती शेतीचं नुकसान झालं आहे. मिरची, वांगी, कारले या पिकांचं नुकसान झालं असून कृषी विभागानं पंचनामे करून आर्थिम मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानाची काल पाहणी केली.

 

गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव शंभर टक्के भरला. यामुळे शहरातील नागरीकांना दिलासा मिळाला असून पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
वाशिम जिल्ह्यातल्या एकबुर्जी या प्रकल्पातही १०० टक्के पाणी भरलं असून त्यातून विसर्ग सुरू आहे.

 

सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण पूर्ण भरल्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट उघडून विसर्ग करण्यात आला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा