एकशे चाळीस कोटी भारतीयांचं जीवनमान सुधारणं हीच रालोआ सरकारच्या लेखी खरी सुधारणा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात केलं आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी केल्यापासून अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या असून सामान्य माणसाच्या बचतीत भर पडली आहे. देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं ते म्हणाले.
Site Admin | June 24, 2024 5:13 PM | India | PM Narendra Modi
देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
