डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 7, 2024 2:50 PM

printer

आयटी क्षेत्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या क्रांतीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयटी क्षेत्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतिन प्रसाद यांनी दिली आहे. ते आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते.

 

सरकारनं देशभरात एकंदर ६५ सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क केंद्रं उभारली असून त्यापैकी ५७ केंद्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमध्ये असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ग्रामीण भागांमध्ये संपर्क जाळं वाढवणं आणि आयटी केंद्र स्थापन करण्यासाठी सरकार आणखी उपक्रम राबवेल, असं त्यांनी सांगितलं. आयटी क्षेत्राने ५४ लाख रोजगार दिले असून त्यापैकी ३७ टक्के कर्मचारी महिला असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा