गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांना मोठा फटका बसला आहे. शासनानं तत्काळ पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी मिरची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्याच्या अहेरी आणि चामोर्शी तालुक्यातील काही भागातही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला असून, यंदा मोहफुलांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
Site Admin | March 23, 2025 9:48 AM | Gadchiroli | Unseasonal Rain
गडचिरोलीत अवकाळी पावसामुळे पीकांचं नुकसान
