डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बंदबाबत न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री

बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला राज्यव्यापी बंद मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये बातमीदाराशी बोलताना त्यांनी सांगितलं, की बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मात्र, त्यावर होत असलेलं राजकारण त्याही पेक्षा दुर्दैवी आहे. 

नेपाळमधल्या बस दुर्घटनेत जळगावमधल्या नागरीकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात नेपाळमध्ये आमदार आणि अधिकारी पाठवून तातडीनं मदत केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

या दुर्घटनेबाबत तातडीनं दखल घेण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले असून नेपाळ सरकारशी समन्वय साधला असल्याचं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. नेपाळ दुर्घटनेतल्या नागरीकांना सर्व प्रकारची मदत केली जाईल, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा