डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार – डॉ. एस. जयशंकर

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार असून, दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्यानं पारंपारिक स्वरुपाच्या पलीकडे मजल मारली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांच्या हस्ते आज मालदीव इथल्या अड्डू रेक्लमेशन अँड अड्डू शोअर प्रोटेक्शन या सागरी भराव आणि संरक्षण प्रकल्पांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. मालदीवमधल्या लोकांच्या जीवनाच्या सर्व पैलूंना अनुसरून त्याचे लाभ मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजना आखणे हे दोन्ही देशामधल्या परस्पर सहकार्याचे उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

अड्डूला प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा शाश्वत मार्ग शोधण्याच्या उद्देशानंच भारत आज उद्घाटन केलेल्या प्रकल्पांसाठी मालदीवचा भागिदार झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पांमुळे क्षेत्रिय विकासासोबतच, रोजगार, उद्योजकता आणि व्यापाराच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध होतील असा विश्वासही जयशंकर यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा