राज्यातही समाधानकारक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.नाशिक जिल्ह्यात खरीपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीपाचं क्षेत्र 6 लाख 41 हजार हेक्टर आहे; त्यापैकी 4 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं जिल्ह्यात सर्वत्र भात रोपणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
Site Admin | July 16, 2024 12:48 PM | Rainfall | खरीप | खरीप हंगाम
राज्यात खरीपाच्या पेरण्यांना वेग
