डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 26, 2024 10:15 AM

printer

संसदेत आजही केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू राहणार

 अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा पाचवा दिवस आहे. लोकसभेत काल केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत काँग्रेसचे चरणजित सिंह चन्नी यांनी या अर्थसंकल्पानं लोकांची निराशा केल्याचा आरोप केला. या अर्थसंकल्पात पंजाबला सावत्र वागणूक देण्यात आली असून पुरामुळे प्रभावित झालेल्या पंजाबमधील लोकांसाठी या अर्थसंकल्पात काहीही तरतूद नाही, असा आरोपही त्यांनी केला.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसद भवनातील पुतळ्याच्या स्थलांतरावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. चन्नी यांनी केलेल्या काही वक्तव्यांवरून काँग्रेस खासदार आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा