गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाने पिकांची नासधूस केल्याने भातशेतीचं नुकसान झालं आहे. या कळपात २८ रानटी हत्ती असून ते कुरखेडा, आरमोरी, शंकरनगर, पाथरगोटा या भागात त्यांनी नुकसान केलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई देण्यात येईल, असं वनविभागाने म्हटलं आहे. हे हत्ती सध्या वैरागड परिसरात चुनबोडीच्या जंगलात गेले असून ते पुढे पोर्ला परिसरात जाऊ शकतात, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
Site Admin | September 15, 2024 3:41 PM | Elephants | Gadchiroli
गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाकडून पिकांची नासधूस
