डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 8, 2024 11:59 AM | Maharashtra

printer

राज्यातल्या दहा जिल्ह्यात पिकांचं नुकसान, आठ लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल

कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार राज्यातील दहा जिल्हयांत पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये खरिपातील सुमारे आठ लाख 48 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली असून, नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कृषी विभागाच्या 24ऑगस्टपासून आतापर्यंतच्या अहवालानुसार खरीप हंगामातील पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे. अतिपावसामुळं पिकांचं नुकसान झालं असेल तर शेतक-यांनी पीक विमा कपंनीला कळवलं पाहिजे, जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल, असंही आवटे म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा