डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य राहणे असेल मुंबई संघाचा कर्णधार

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठीचा मुंबई संघ जाहीर झाला असून, इराणी चषक स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटू तनुष कोटियन याला मुंबई संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. २०२४-२५ च्या या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांसाठी १६ सदस्यीय मुंबई संघातून तनुष आपलं कसब दाखवेल. स्पर्धेच्या ‘एलिट ग्रुप ए’ चा सामना येत्या शुक्रवारी बडोद्यातल्या कोटांबी क्रीडांगणावर होत असून मुंबई संघाची लढत बडोदा संघाशी होईल. मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य राहणे आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा