केंद्र सरकारने अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हिसकावून घेतली आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे केला. शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे सरकारची ‘सब का साथ सब’ का विकास ही घोषणा या घटकांची थट्टा करणारी आहे, अशी टीका त्यांनी केली. केंद्र सरकारने फक्त शिष्टवृत्तीत कपात केली असं नाही तर दरवर्षी शिक्षणासाठीच्या निधीत २५ टक्के निधी कमी केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Site Admin | February 25, 2025 1:24 PM | Congress
सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हिसकावून घेतल्याची काँग्रेसची टीका
