डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातल्या गणपती विसर्जनाबाबत खोटी बातमी पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करत, प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष ॲड. रविप्रकाश जाधव यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. 

 

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात खोटी माहिती प्रसारित करून समाजात तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा, तसंच सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा