२०२५-२६ च्या पणन हंगामासाठी रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यात गव्हाच्या किमान आधारभूत दरात दीडशे रुपये वाढ केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसंच बाजरी १३० रुपये, ज्वारीत १३०, हरभरा २१०, मसूर २७५, मोहरी ३००, आणि सूर्यफूलाच्या किमान आधारभूत दरात १४० रुपये वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा निर्णय घेतल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं.
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ ४९ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६४ लाख निवृत्ती वेतनाधारकांना होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या दीनदयाल उपाध्याय मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यात गंगा नदीवरल्या रेल्वे आणि रस्ते पुलाच्या बांधकामालाचा समावेश आहे. या प्रकल्पाला ६४२ कोटी रुपये खर्च येईल, असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.