October 17, 2024 8:22 PM | Bihar

printer

बिहारमध्ये विषारी दारूच्या सेवनाने २५ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये भेसळयुक्त दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत सिवानमध्ये २० जणांचा, तर  सारण जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दारूबंदी आणि उत्पादन शुल्क मंत्री रत्नेश सदा यांनी दिली. दारू पिणाऱ्यांपैकी  २२ जणांची प्रकृती गंभीर असून, ३ जणांची दृष्टी गेली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून, मृतांच्या कुटुंबांना  दारूबंदी कायद्यानुसार नुकसान भरपाई दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.