प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाच्या आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या मोहिमेची धाराशिव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी २७ जानेवारीपासून जिल्हाभरात दोन आठवड्याचं शिबिर घ्यावं, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | January 21, 2025 8:44 AM | Ayushman Card | Dharashiv
धाराशिवमध्ये आयुष्यमान कार्ड काढण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
