डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भाजपा सत्तेत असेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित केलं जाणार नाही – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भाजपा सत्तेत आहे तोपर्यंत जम्मू काश्मीरमधलं ३७० कलम पुनर्स्थापित केलं जाणार नाही, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. रामबान जिल्ह्यात ते आज प्रचारसभेला संबोधित करत होते. केंद्रशासीत प्रदेशात आहे तीच स्थिती कायम ठेवण्याच्या भाजपाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला, तसंच जम्मू काश्मीर मध्ये होत असलेल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्याचं सांगितलं. जम्मू काश्मीरमधल्या निवडणुकांकडे जगाचं लक्ष लागल्याचंही ते म्हणाले. ३७० कलम काढून टाकल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचंही राजनाथ सिंह यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरचा प्रवास दहशतवादासाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्यापासून पर्यटनासाठी ओळखलं जणारं राज्य म्हणून झाल्याचंही सिंह म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा