आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री पय्यावुला केशव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी आंध्र प्रदेशमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल देत त्यावर चर्चा केली.
पुरामुळे अनेक नागरिकांचं मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांची कर्ज देयकात तसंच कर्जावरील व्याज दरात सवलत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावतीनं केशव यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मांडला. यावर विचार सुरू असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगत, आवश्यक असल्यास अतिरीक्त मदतीचं आश्वासनही दिलं.
Site Admin | September 11, 2024 2:14 PM | FM Nirmala Sitharaman
आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री पय्यावुला केशव आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट
