डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाणार

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल, तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलत होते.
दरम्यान, संत मुक्ताबाईंच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. शहरात माळीवेस इथल्या हनुमान मंदिरात मुक्ताईंच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या आहेत. आज ही पालखी पेठ बीड भागातल्या बालाजी मंदिरात पोहोचणार आहे.
अंमळनेर इथल्या संत सखाराम महाराज यांची दींडी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौलताबाद इथं मुक्कामी होती, ही दींडी आज वाळूजला पोहोचणार आहे. पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज राक्षसभूवन इथला मुक्काम आटोपून पुढे मार्गस्थ होत आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज जेजुरीतल्या मल्हारनगरीत पोहोचणार आहे. तर संत तुकाराम महाराजांची पालखीनं काल लोणी काळभोर ते यवत काल २७ किलोमीटरचा सर्वात मोठा टप्पा पार केला. आज ही पालखी यवतहून मार्गस्थ होत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा