विधिमंडळांची कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी त्यांचे सदस्य वचनबद्ध असल्याचं मत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज व्यक्त केलं. पाटणा इथं अध्यक्षतेखाली आयोजित ८५व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचा आज समारोप झाला. समारोपाच्या भाषणात बिर्ला बोलत होते. ही परिषद फलदायी ठरली असून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर सहभागींनी सहमती दर्शवल्याचं त्यांनी सांगितलं.
भारताची राज्यघटना पुरेशी लवचिक असून त्यामुळे आपल्या संसदीय लोकशाहीने संकटांचा सामना यशस्वीपणे केला आहे, असं मत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केलं. “भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे : घटनात्मक मूल्यांच्या बळकटीकरणासाठी संसद आणि राज्य विधान मंडळे यांचे योगदान” या विषयावर ते काल बोलत होते.