बिम्सटेक देशांच्या कृषिमंत्र्यांची आज नेपाळची राजधानी काठमांडू इथं बैठक होत आहे. देशांमधील कृषिक्षेत्र फायदेशीर बनवणं आणि त्यासाठी परस्पर आदानप्रदान वाढवणं हा त्यामागचा हेतू असून याविषयी तज्ज्ञांच्या सहाय्यानं यामध्ये चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं प्रतिनिधिमंडळ या बैठकीत सहभागी होत आहे.