केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत शेतकऱी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली. आपण जवळपास ५० शेतकरी नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मुद्दे जाणून घेतल्याचं चौहान यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी तिचा आत्मा आहेत, असंही ते म्हणाले. शेतकरी नेत्यांनी पिकांचे दर आणि पिक विमा याबद्दल अनेक सूचना केल्याचंही चौहान यांनी सांगितलं.
Site Admin | September 24, 2024 1:32 PM | Shivraj Singh Chouhan
कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा
