डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जालना जिल्ह्यात ट्रक आणि बसची टक्कर होऊन ६ जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात मठतांडा गावाजवळ आज एक एसटी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सहाजण ठार, तर २३ जण जखमी झाले. जालना-वडीगोद्री महामार्गावर सकाळी साडेआठच्या सुमाराला हा अपघात झाला. ही बस गेवराईहून जालन्याकडे निघाली असताना, समोरुन येत असलेला ट्रक या बसला धडकला.

 

त्यात बसचा वाहक आणि तीन प्रवासी, तसंच ट्रकचा चालक, आणि वाहक, असे सहाजण जागीच ठार झाले. जखमींपैकी १३ जणांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा