पालघरच्या तीन तरुणांचा आज सकाळी गुजरातमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हे तिघेही राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्गा इथे गेले होते. तिथून परतताना वाटेत गुजरात इथे अंकलेश्वर जिल्ह्यात त्यांच्या गाडीला ट्रकची धडक बसून अपघात झाला. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Site Admin | January 8, 2025 6:58 PM | Accident
गुजरातमध्ये झालेल्या अपघातात पालघरच्या तीघांचा मृत्यू, ४ जखमी
