डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण

यंदा पावसानं जूनच्या पहिल्या आठवड्यातच हजेरी लावल्यामुळं धाराशिव जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी सोयाबीनच्या पिकासाठी सर्वाधिक क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या आहेत. पेरण्या करण्यात आलेल्या अन्य पिकांमध्ये मूग, उडीद, तूर, मका यांसारख्या पिकांचा समावेश आहे. गेल्या ४-५ दिवसात उघडीप दिलेल्या पावसानं काल पुन्हा हजेरी लावल्यामुळं उगवण्याच्या बेतात असलेल्या पिकांना जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा